क कपाशीचे पात्याची गळ

कपाशी चे पाते खुप गळत आहेत काय करती येईल ते सांगा

एकूण १० पाते संख्यातून केवळ ३-४ पाते झाडावर टिकून राहतात उर्वरित गळून पडतात.
गळून पडण्याचे कारण झाडामध्ये अन्नद्र्व्यासाठी निर्माण झालेली स्पर्धा पातेच्या ठिकाणी तयार झालेली अब्सेसीक थर अशी बरीच कारणे कारणीभूत ठरतात पातेगळ साठी.
जास्त प्रमाणात पातेगळ होत असल्यास २% डीएपी (२०० ग्रॅम/१० लिटर पाणीसाठी) सोबत प्लॅनोफ़िक्ष (NAA)@ ३ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
महिन्यातून २-३ वेळा वरील प्रमाणे नियोजन करावे.

2 Likes