काही प्रमाणात पाते गळ होवू लागली आहे

आपण दिलेल्या सर्व माहितीचे तंतोतंत पालन करून आज रोजी आमच्या शेतात कपाशी छान पैकी बहरली आहे,

एकूण १० पाते संख्यातून केवळ ३-४ पाते झाडावर टिकून राहतात उर्वरित गळून पडतात.
गळून पडण्याचे कारण कमी सूर्य- प्रकाश, झाडामध्ये अन्नद्र्व्यासाठी निर्माण झालेली स्पर्धा पातेच्या ठिकाणी तयार झालेली अब्सेसीक थर अशी बरीच कारणे कारणीभूत ठरतात पातेगळ साठी.
जास्त प्रमाणात पातेगळ होत असल्यास २% डीएपी (२०० ग्रॅम/१० लिटर पाणीसाठी) सोबत प्लॅनोफ़िक्ष (NAA)@ ३ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
महिन्यातून २-३ वेळा वरील प्रमाणे नियोजन करावे.