काकडी वाकडी होता आहे

काकडी वाकडी होता आहे उपाय सांगा

@ मोहन जी काकडी ची फळे वाकडी होण्याची दोन करणे आहेत.
जर फळमाशीने डंक मारलेले असेल त्यामुळे व दुसरे म्हणजे खतांची कमतरतेने फळे वाकडी होतात.
फळमाशीमुळे जर झालेले असेल तर फळांवर डंक मारलेल्या ठिकाणी डींक आलेले असतात.

फळ माशी नियंत्रणासाठी शेतात एकरी २० फळ माशी सापळे लावावे. कुजलेले फळांची काढणी करून योग्य विल्हेवाट लावावी. फळांचे आकार व वजन वाढण्यासाठी ०.५२.३४ हे विद्राव्ये खत @५ किलो /एकर व ५ दिवसांनी ०.० .५० @५ किलो /२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.